Sunday, November 10, 2013

प्रेम हे असेच असते.....

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. 
एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून, उडून तर जाणार नाही ना? ....
तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर
तू मला पकडून घेशील... 

चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर
शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. 
हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला 
आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... ... ... 

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत
नव्हता.. चिमणी मात्र..

तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. 

थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. 
पाहते तर चिमणा मरून पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. 

"प्रिये,
फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर
कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू
शकले नसते..."


प्रेम हे असेच असते.....

Wednesday, May 1, 2013

केव्हा परत येशील?


तुला जर माझे दुःख कळत असेल तर तू परत येशील,
माझे प्रेम तुला उमगत असेल तर तू परत येशील,
प्रेमाचे ते क्षण जर खरच मौल्यवान असतील तुझ्यासाठी तर तू परत येशील,
माझ्या भावना समजत असशील तर तू परत येशील,
तुझ्यासाठी तोडलेली नाती त्याची किम्मत असेल तुझ्यासाठी तर तू परत येशील,
शरीर वेगळे, हृदय वेगळे, प्राण वेगळा तर कशी माझ्याविणा राहशील,
माझी आठवण येईल जेव्हा, रडू येईल तुला, का तेव्हा परत येशील ?    

वाट बघतोय ग तुझी... डोळे पण थकलेत आता केव्हा परत येशील?    

Sunday, April 21, 2013


(FB पोस्ट वरून )

(FB पोस्ट वरून )

अपने करम की कर अदाये ये येये....
यारा यारा यारा यारा

मुझको इरादे दे, कस्में दे, वादे दे
मेरी दुवाओंके इशारोंको सहारे दे
दिल को ठिकाने दे, नये बहाने दे
ख्वाबों की बारीशोंको मौसम के पैमाने दे।         

अपने करम की कर अदाये
कर दे इधर भी तू निगाहें  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  

मंजिले रुसवा है, खोया है रास्ता  
आये ले जाये, इतनी सी इल्तजा
ये मेरी झमानत है, तू मेरी अमानत है
हां...

अपने करम की कर अदाये
कर दे इधर भी तू निगाहें  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  
   
वक्त भी ठेहरा है, कैसे क्युं यह हूआ
काश तू ऐसे आये, जैसे कोई दुवा
आ तू रूह की राहत है,
तू मेरी ईबादत है

अपने करम की कर अदाये
कर दे इधर भी तू निगाहें  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  
       
सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  
यारा....

(From: Aashiqui 2 )

Tuesday, April 16, 2013

पुनर्जन्म असतो का???

१५ एप्रिल २०१३

ऑफिस मधून घरी आल्यावर मी आंघोळ करून पुजेसाठी बसलो होतो. तसे मी काही रोज पुजा पाठ करत नाही. पण काही दिवसांपासून देवाकडे काही मागतो आहे, माझे प्रेम, माझे जीवन जे माझ्यापासून दूर चालले आहे, ते मागतो आहे. त्यासाठी कित्येक वेळा त्या भगवंताच्या विनवण्या- आळवण्या करीत आहे. बाकी सर्व त्याच्या हातात आहे.

हा तर मी कुठे होतो ? हा पुजेसाठी बसलो होतो. पुजा करताना ध्यान मग्न होऊन देवाला आळवित होतो. माझ्या प्रेमाचा उद्धार करावा म्हणून त्यास विनवीत होतो. मी तिचाच विचार करत होतो. तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता अन डोळ्यातून अश्रूंची धार लागली... त्यातच कधी मी ध्यानस्थ झालो माझे मलाच माहीत नाही... पण जे काही मला अनुभवास आले किंवा दिसले ते सांगण्याकरिताच मी लिहीत आहे.

३० वर्षापूर्वी.... पालीनगर नावाचे एक छोटेसे गाव मध्यप्रदेशमध्ये होते. या गावात एक कुंभार राहत होता. कुंभार मेहनतीने मडके बनवायचा अन दुसर्‍या गावी जाऊन ते विकून आपले पोट भरायचा. या कुंभाराला एक सुंदरशी मुलगी होती, नाव होते हंसामती. ती त्याला मडके बनवण्यात मदत करत असे. कुंभाराची बायको आजाराने मुलगी लहान असतानाच वारली होती. बापाने तिचे संगोपन करून वाढवली, १५-१६ वर्षाची झाली होती ती, वयात आली होती. बापाला तिच्या लग्नाची चिंता लागली होती.

त्याच गावात ईश्वर नावाचा एक चरवाह (मेंढपाळ) राहत होता. १७ वर्षाचा तो मुलगा आपल्या आई सोबत राहत असे. रोज तो मेंढरे चारायला गावाबाहेर नेत असे. गावाबाहेर जाणारी वाट त्या कुंभाराच्या घरासमोरून जाई. सकाळच्या सुमारास हंसा मडकी घेऊन अंगणात वळवण्यासाठी रचून ठेवीत असे. असेच एकदा दोघांची नजारा नजर झाली. मेंढपाळाचे मुलीवर बघताच क्षणी प्रेम बसले. त्याने पाण्याच्या निमित्ताने तिच्याशी बोलण्याचे ठरवले.

त्याने दार ठोठावले अन विचारले "कोणी आहे का घरात ?"
आतून आवाज आला. "बाबा नाही आहेत घरात तुम्ही नंतर या"
"पानी हवे होते प्यायला"

तिने पेल्यात पाणी आणून दिले त्याला. त्याने तिच्याकडे बघतच पाणी पिले. आता रोज तो पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला बघत असे. ती ही त्याच्याकडे आकर्षित झाली होती. रोजच्या भेटी गाठीने दोघांचे प्रेम वाढू लागले. दोघे दुपारी गावाच्या वेशीबाहेर वडाच्या झाडामागे भेटत असत. असेच प्रेमाचे दिवस चालले होते.

एक दिवशी कुंभार आनंदाने घरी आला. त्याने त्याच्या मुलीसाठी चांगले स्थळ शोधले होते. पाच कोसावर असलेल्या गावात तो आपली मुलगी देणार होता. मुलीला त्याने सर्व संगितले. मुलीचे मन हिरमुसले, पण बापाच्या आनंदासमोर तिने आपले प्रेम बळी दिले. दुपारी ती त्याला भेटली.

"आता आपले नाते संपले आहे. आपल्या हातातून निसटले आहे सगळे. मी काही करू शकत नाही. माझे लग्न ठरले आहे. तू मला विसरून जा, आपले जीवन आनंदाने जग."
"कसे जगू? तुझ्याविणा हे सर्व जग, धन दौलत, प्रेम, नाते संबंध सगळं सगळं व्यर्थ आहे. मी नाही जगू शकत तुझ्याविणा."
"तुला मला विसरावेच लागेल." ती रडत निघून गेली.
मुलगा तिला पाठमोरी जाताना बघत राहिला. त्याला काय करावे ते सुचेना...

लग्नाचा दिवस उजाडला होता. कुंभाराच्या घरी लग्नाची तयारी चालू होती... दोन दिवसापूर्वी ते जोडपं पुन्हा एकदा भेटले होते. शेवटचे एकमेकांना बघायला, दोघं एकमेकांशी बोललेच नाहीत, बोलत होते ते फक्त त्यांचे डोळे. प्रेमाने उर दाटून आला होता. दोघांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले होते. पण तरीही ते दोघ बोलले नाहीत, बोलूच शकत नव्हते.

लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. मुलीला लग्नमंडपात बोलावले. मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. पण तिचे डोळे रडून रडून सुजले होते. इकडे लग्नाची सुरवात झाली. तिकडे मुलाने घरात गळफास लावून घेतला. त्याने आत्महत्या केली. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, तो तिला दुसर्‍याच्या घरी जाताना पाहू शकणार नव्हता..

एक जीव गेला. आता दुसर्‍याची बारी होती. लग्नाचे चार फेरे पूर्ण झाले होते. पाचवा फेरा होणारच होता त्यातच मुलगी चक्कर येऊन खाली पडली. तिच्या तोडून सफेद फेस येऊ लागला होता. तोंड घामाने डबडबलेले होते. अर्ध्या तासापूर्वी तिने विष पिले होते. पाच मिनिटातच तिचे ही प्राण पाखेरू उडून गेले. दूसरा जीव ही आपले प्रेम निभावून गेला...

मी दचकून भानावर आलो. मी घामाने ओला चिंब झालो होतो. घाबरलेलो होतो. तिला मरताना मी पाहू शकलो नाही. माझे अश्रु पुन्हा ओघळू लागले. जे काही मी पाहिले किंवा अनुभवले, ते सत्य होते का? कारण ज्या गोष्टी त्यांच्या बरोबर घडल्या होत्या तश्याच माझ्या जीवनात ही घडल्या आहेत. तिचे लग्न ठरले आहे. १ महिन्याने तिचे लग्न आहे. कदाचित ती घटना माझ्या मागच्या जन्माची तर नाही ना ? पुन्हा माझ्यासोबत तेच घडत आहे असे तर नाही ना ? मला तर ते गावं सत्य परिस्थितीत आहे की नाही ते ही माहीत नाही. मला हे ही माहीत नाही जे पाहिले ते स्वप्न होते की माझा भास..  कुणीतरी सांगेल का? मला माझे प्रेम भेटेल का??? खरच पुनर्जन्म असतो का???                

(कृपया माझ्या प्रेमासाठी प्रार्थना करा. I need your blessings,badly.)
                     
                                          

तु तिथं मी ( एक प्रेमकथा ).....

शारदा किती उशीर किती वेळ तुझी वाट पाहायची,
रात्रीचे साडे अकरा वाजुन गेले की गं,
अरे हो रे, आज थोडा उशीरच झाला,
पण तुझ्यासाठी काही आणलंय मी ?
काय ?
उकडीचे मोदक तुला खुप आवडतात ना ??
हो खुपच आवडतात, रवी डब्यातला एक मोदक
खातो.....

आणि तिच्याकडे बघुन विचारात पडतो तिला विचारतो,
"शारदा तुला भिती नाही का गं वाटत ?
गेली सहा महीने रोज रात्री आपण या झाडाखाली भेटतो,
तु माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊ,
न येतेस कशाची भीती ?
भुताखेतांची ?
बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे,
आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं तर ?
तर ते भुत तुच असशील,
चेष्टा पुरे हं आता.....

Ok Sorry, Sorry तु असलास की,
मला कसलीही भीती वाटत नाही रवी,
असं,मग मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे सांग
ना मला ?
पुन्हा कधीतरी सांगेन,
आत्ता उशीर होतोय मला जायला हवं,
अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना,
जे ऐकायसाठी मी इथे आलोय,
तुच म्हण ना मग.....
i Love u Sharada...
Mi too.....

12 तासानंतर .....

शारदाला वाचनाची खुपच आवड आहे,
पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस वेळच
मिळाला नाही वाचनासाठी,
पण आज तिला वेळ मिळालाय,
म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन
असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय,
तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच पुस्तकांच्या कपाटामध्ये ती सत्यकथांवर
आधारीत असलेली पुस्तके शोधतीये...
त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळतं जे पंचवीस
वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक
आहे,
जेव्हा ती ते पुस्तक उघडते,
तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच सरकते,
तिच्या तोंडचं पाणी पळतं, अंगाचा थरकाप होतो,
ती त्या पुस्तकातली काहीच पाने उलगडतीये,
त्यानंतर ते पुस्तक घेउन
या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथालया
व्यक्त करते.....

त्यांच्याकडे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात,
तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर असतो,
शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते,
एक पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात...
दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच घाबरतात,
त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो,
त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतं,
की ते आपल्याला आधीपासुनच ओळखतात,
आणि तिला खुपच घाबरताहेत,
हे पाहुन शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन
देते,
तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते,
तेच त्या पुस्तकाचे लेखक होते,
त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील या सत्यघटनेविषयी शारदा त्यांना विचारते.....

ते सांगु लागतात ; पंचवीस वर्षापुर्वीची गोष्ट
आहे,
जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत
काम करायचो,
एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार
होता म्हणुन आमची कमिटी तिथलं निरीक्षण
करायला गेली होती,
पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते...
एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती,
त्याला मारु नका, त्याला मारु नका, असं म्हणत होती...
पण कोणीही ऐकलं नाही आणि सर्वाँसमोर त्याला एका झाडावर लटकवण्यात
आलं आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला.....

पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात जो फोटो दिलाय
तो तर माझ्या प्रियकराचा आहे,
त्याला तर मी रोज भेटते आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो,
मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच तुमच्याकडे आलेय...
पोरी ही निसर्गाची किमया म्हण किँवा आणखी काही पण
हा तोच मुलगा आहे,
ज्याच्यावर तु प्रेम करतेस,
पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु शकता ???
त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला,
आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता,
ही आहे ती मुलगी जी त्या मुलावर प्रेम
करायची आणि जिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.....

तो फोटो शारदाचाच होता,
म्हणुनच तर
मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं तेव्हा घाबरलो होतो,
मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदा तिथुन निघाली,
मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते,
रवी मेलेला आहे ही गोष्ट गृहीत धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व
गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता,
शारदाला ही गोष्ट पुर्णपणे पटली की,रवी जिवंत नाहीये.....

रात्र झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच
झाडाजवळ आली होती,
आज पुन्हा उशीर, अगं कितीवेळा तु उशीर करतेस ?
आणि हे डाव्या हाताला कापड कसलं बांधलयस ?
रवी मला तुला काही विचारायचंय ? मला खरं खरं सांगशील ?
हो, विचार नक्की खरंखरं सांगेन तुझा जन्म केव्हाचा आहे ?

रवीः शेवटी तुला सगळं कळलंय तर,
अगं मग मला असं तिरक्याने का विचारतेयस,
सरळ विचार ना...
होय मी एक आत्मा आहे,
मी तुला सगळं खरं खरं सांगतो,
त्याची गरज नाहीये, मला सगळं ठाऊक आहे,
मला फक्त
एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस की नाही ?
मी फक्त तु जिथे जाशील तिथेच जायचंय ? सांग मला सोबत नेशील ना ?
शारदा काय बोलतेयस तु ?मी तुझा जीव नाही घेउ शकत,
तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु ?
जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय मी.....

काय ? काय केलंयस तु ?
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं,
आणि त्याला दाखवलं, तिच्या हाताची नस कापलेली होती...
अगं हे काय केलंस ? याने तुझा जीव जाईल चल...
थांब रवी माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापुर्वीच,
मी ही आत्ता जीवंत नाही, माझं शरीर मी मागे ठेवुन
आलेय,
आत्ता तरी मी तुझी होईल ना, आता तरी मला तुझ्यासोबत नेशील ना ?
रवीने शारदाला एक घट्ट मिठी मारली त्या मिठीतला ओलावा दोघेही अनुभवत होते,
दोघांच्याही डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते,
पण ते जमिनीवरही पडत नव्हते, हवेतच विरुन जायचे,
जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय
शारदा आणि रवीसारखं.........


(From FB POST)